प्रा. गोपाळ गुरू यांच्या अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. ‘ते लेखन सिद्धांतांशी झटपट करते, कृतीच्या संभाव्यता सूचित करते, वर्तमानावर भाष्य करते, प्रतिवाद करते. या सर्वांच्या मध्यवर्ती जर काही एक सूत्र असेल, तर ते वर्चस्वाच्या चौकशींचा परामर्श घेण्याचे आणि त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नांचे आहे’, असे प्रा. सुहास पळशीकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.
पुस्तकाचा पहिला विभाग दलित चर्चाविश्व, दुसरा विभाग राजकारण व समाजकारण आणि तिसरा विभाग दलित चळवळ. पहिल्या विभागात सामाजिक न्याय, खैरलांजी, दलितांच्या संस्कृतीचे वस्तुकरण आदी विषय हाताळले आहेत. दुसऱ्या विभागात नव दलित राजकारण, एनजीओंचे अर्थकारण, महाराष्ट्राचे महिला धोरण, साखर कामगार चळवळ, साम्यवाद आदींवर चर्चा केली आहे. तिसऱ्या विभागात दलित चळवळीचे विश्लेषण, दलित पँथरचा उदय, ब्राह्मणेत्तर चळवळ आदींवर भाष्य आहे.
प्रकाशक : हरिती प्रकाशन
पाने : २६१
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)